१३ जुलै २०११, आज पुन्हा एकदा मुंबापुरीला bomb blastsनी हादरवून सोडलं. दादर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलंय..!!
नेहमी मुंबई, ठाणे आणि पुणे यावरून वाद घालणारा मी आज पुन्हा एकदा हळहळलो. मुंबई पेक्षा ठाणे आणि पुणे prefer करण्याचं अजुन एक reason आज मला मिळालं होतं खरं, पण ह्या वेळी १ reason वाढल्याचा आनंद झाला नाही..
Spirit - Spirit च्या नावाखाली भरपूर सोसलं आहे मुंबईने..अजुन किती दिवस मुंबई हे सगळं सहन करणार?
"बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है" असं म्हणत बसून किंवा ह्या गोष्टींवरून राजकारण करून कहीही होणार नाहीये हे माहीत असून सुद्धा कुठलीच action घेतली जात नाही ह्या बद्दल खरं तर खंत व्यक्त केली पहिजे.
जगातलं so called "One Of the best Police department" म्हटलं जाणारं मुंबईचं पोलीस खातं, कुठे आणि काय खात बसलं आहे ही खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
news channelsना एक news मिळाली. सनसनाटी खबर. मग channels मध्ये चुरस.
राजकारणी लोकांना राजकारण समाजकारणात गुरफटण्याची अजुन एक संधी मिळाली.
पोलीस खात्याला अजुन एक Challenge मिळाला आणि आतंकवादाला मुंबापुरीशी छेडखानी करण्याचं समाधान मिळालं.
पण ह्या सगळ्यांत पुन्हा एकदा फरपट झाली ती सामान्य माणसाची. सकाळी officeला गेलेला रात्री घरी परतेल की नाही ह्याचीही त्याला खात्री राहिलेली नाही.
मुंबईला जिवंत ठेवण्यासाठी हा माणूस अजुनही मरतोय. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांची सांगड घालता घालता नाकी नऊ आले तरीही सकाळी भाऊगर्दीमध्ये धक्के खात खात ७:२१ ची लोकल अगदी वेळेत गाठतोय. ह्या भाऊगर्दीमध्ये तो कधी हरवून गेलाय हे देखील त्याला कळलं नाही.
Bomb Blasts, दंगल, दगडफेक, लाचखॊरी ह्या सगळ्या गोष्टींना त्यानी conveniently आपलसं करून घेतलंय. A PART & PARCEL OF LIFE. ही कदाचित त्याची मजबुरी असेल किंवा So Called "SYSTEM" ची भिती. Survival of the Fittest च्या नावाखाली स्वतःला prove करताना अश्मयुगातील माणसापेक्षाही जास्त मागे पडत चालला आहे. I can explain his state of mind in just one word - "CONFUSED".
अश्यावेळी अवधुत गुप्ते च्या गाण्यातल्या २ ओळी आठवतात -
"मंजिलॊंकी मुझकॊ तलाश है, पर पता नही किस तरफ़ बढूं
हाथ में मेरे तलवार है, पर पता नही के किससे लढूं"
मनात हजार प्रश्न, हजार शंका पण उत्तर कसलेच नाही. त्याची स्थिती सध्या अभिमन्यु सारखी झाली आहे. चक्रव्युहात पुरता अडकून गेला आहे.
आता मनात एकच आशा आहे की २०११ सालात तरी ह्या अभिमन्युला चक्रव्युहातून आपली सुटका करता यावी.....!!!!
शेवटी मी ठाणेकर असल्याचा कितीही अभिमान असला तरीही आज at the end of the day my heart says - Hats off to मुंबईकर...
-मंगेश केळकर
blast che photo man sunna karanare aahet...rag yeto... vatal aata thambalay sarva...pan nahi punha tech
ReplyDeleteapan khup used to zhaloy terror attackna atta..tyalach maybe sagale loka never dying spirit mhantat..bomb blast zhalyavar phakt athavan yete aplya lokanchi.ani mag phakt te sukhrup ahet ki nahi hech mahit karanyat jeev ghabara hoto..
ReplyDeletenete mandli crime site visit var tourist visit maratat ani parat sagale manat rang gheun jagat rahatat..
Gautami
Khupach heart touching ahe re.
ReplyDeletePrutha