आज १५ ऑगस्ट.. ६५ वा स्वातंत्र्यदिन.. Independence Day चा Counter वाढला..
एवढी वर्ष उलटून गेली, एवढ्या गोष्टी घडून गेल्या, तरी अजुन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी म्हटलं की पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी चघळण्यास सुरूवात होते..
OM TAT SAT !!!
( A Prayer by Chinmay Mission...!!! )
-मंगेश केळकर
(१५ ऑगस्ट २०११)
एवढी वर्ष उलटून गेली, एवढ्या गोष्टी घडून गेल्या, तरी अजुन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी म्हटलं की पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी चघळण्यास सुरूवात होते..
आज रस्त्यांवर तिरंगा विकणारी माणसं आणि उद्या १६ ऑगस्टला त्याच तिरंग्यांचा रस्त्यावर झालेला कचरा उचलणारी मणसं हे चित्र भारतीयांसाठी काही नवीन नाही.. TV वरच्या प्रत्येक कार्यक्रमातही देशभक्ती वाहू लागते.. खरंच बाकीचे ३६४ दिवस आपल्याला देशभक्ती आठवत नाही का?
रस्त्यावर ठिकठिकाणी झेंडावंदन, ते पण कोणत्या तरी political party तर्फे.. बाजूला पार्टी आणि त्या पार्टीच्या नेत्याच्या नावाचं होर्डिंग मात्र नक्की असतं.. बहुतांशी सार्वजनिक ध्वजारोहण सोहळे हे राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनच का केले जातात हे एक कोडंच आहे..
भगतसिंग, सुखदेव, टिळक, आगरकर अश्या थोरामोठ्यांबद्दल काहीही माहित नसताना दुस-यांनी लिहीलेली आणि १ दिवस पाठांतर करून दिलेली भाषणं ऐकून वीट आलाय.. पण अश्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना त्यांनी केलेल्या कार्याची आणि बलिदानाची जाणीव खरंच असते का?
पुरातनकाळापासून चालत आलेली देशभक्तीपर गीते.. दरवर्षी तीच तीच ऐकून त्यांचाही कंटाळा आलाय.. पण मग आज काल देशभक्तीपर गीते का होत नाहीत? ह्याचं कारण खरंतर शोधायला हवं.. ह्या आणि अश्या अनेक गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत..
आज काल तर काय म्हणे १५ ऑगस्टच्या दिवशी Red Alert आणि High Security असते.. हे तर म्हणजे स्वातंत्र्यदिनीसुध्दा पारतंत्र्यात असल्याची जाणीव करून देण्यासारखं आहे.. फक्त १५ ऑगस्टच्या दिवशी high security ठेवली म्हणजे आपला देश खरंच सुरक्षित आहे / राहतो का? अश्या महत्त्वाच्या दिवशी High Security आणि Red Alert का द्यावा लागतो ह्याची करणं आधी शोधायला हवीत..
माझ्यात तेवढी कुवत नाही आणि ताकदही नाही कि ह्या सगळ्या गोष्टींची कारणमिमांसा करता येईल.. पण खारीचा वाटा उचलण्याची आणि तो पेलण्य़ाची क्षमता नक्कीच आहे.. ६४ वर्षांनंतरही आपल्या देशाला खरंच स्वातंत्र्य मिळालंय असं काही वाटत नाही.. पण ह्या पुन्हा जन्माला आलेल्या स्वातंत्र्य लढ्यात मेधा पाटकर आणि अण्णा हजारेंसारख्यांना माझी साथ नक्कीच असेल ह्यात दुमतही नाही..
चला पुन्हा एक होऊया आणि जग जिंकुया.. खरं तर आधी आपल्याला आपली माणसं जिंकायची आहेत.. ती जिंकली की जग सारं आपलंच आहे.. Let's Unit and Fight Against All Bad Tendancies and False Values in the society..
ह्या वेळी मला आमची एक प्रार्थना आठवते.. नववीत असताना आमच्या सहस्त्रबुद्धे बाईंनी शिकवली होती. आम्ही ती रोज म्हणायचो.. पण त्याचा खरा अर्थ आत्ता लागतोय..
We stand as one family
Bound to each other with love and respect.
We serve as an army,
Courageous and disciplined
Ever ready to fight against all low tendencies and false values
Within and without us.
We live honestly
The noble life of sacrifice and service.
Producing more than what we consume
and giving more than what we take.
We seek the Lord's grace
To keep us on the path of virtue, courage and wisdom.
May Thy grace and blessings flow
through us to the world around us.
We believe that the service of our country
is the service of the Lord of Lords,
and the devotion to the people
is the devotion to the Supreme Self.
We know our responsibilities,
give us the ability and courage to fulfill them.
( A Prayer by Chinmay Mission...!!! )
-मंगेश केळकर
(१५ ऑगस्ट २०११)
No comments:
Post a Comment