Wednesday, July 20, 2011

पाऊस, खड्डे आणि राजकारण...!!!


खरं तर पाऊस, श्रावण आणि त्यासोबत येणारे निसर्गाचे सौंदर्य या सगळ्यांवर आजतागायत भरपूर लिखाण झालं, कित्येक गाणी किंवा कविता झाल्या. सगळ्याच HIT झाल्या असं नाही पण if we count this number, it can definitely create a World record. आजवर इतर कुठल्याही भाषेत, इतर कुठल्याही विषयावर एवढं लिखाण झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही...
पण सद्य परिस्थीती काहीशी वेगळी आहे. सध्या पाऊस, श्रावण आणि त्यासोबत येणारे नैसर्गिक (किंवा कृत्रिम) खड्डे यांवर जेवढया चर्चा, विवाद आणि राजकारण होतं त्यापुढे कुठल्याही जगातला कुठलाही World Record फिकाच पडेल याबद्दल दुमत नाही.


पाऊस पडला नाही ह्याला जबाबदार कोण? तर कोणता तरी राजकीय पक्ष.. का तर म्हणे ह्यांच्या काळात वृक्षारोपण कमी झालं..
पाऊस जास्त झाला आणि पूर सदृश्य परिस्थीती झाली तरीही जबाबदार राजकीय पक्षच.. का तर म्हणे पाण्याचा निचरा करण्याची योजना चुकीची होती..
राजकारणीही तितकेच चलाख.. आपलं खापर दुसर-या नेत्यावर किंवा राजकीय पक्षावर फोडून मोकळे होतात..
किंवा एक ठरलेलं उत्तर म्हणजे कंत्राटदार..

मग विरोधी पक्षाचे सरकारवर ताशेरे.. मग सरकार कडून कोट्यावधी रुपयांची मंजुरी (फक्त खड्डे बुजवण्यासाठी किंवा ते दुरुस्त करण्यासाठी)..
आकडेवारी तर खरंच थक्क करून टाकणारी आहे.. २५०० खड्डे दुरुस्त करायला सरकारचं करोडो रुपयांचं budget ?? Expert Economistsना पण कठीण जाईल असं हे अर्थकारण राजकारणीच खेळू शकतात.. सत्ता आणि पैसा यांच्यासाठी हपापलेली ही राजकारणी मंडळी आपल्या खिशाचे खड्डे भरण्यासाठी अर्थकारणाची सगळी समीकरणंच बदलून टाकतात..

कंत्राटदार आणि राजकीय नेते (किंवा पक्ष) यांचे लागे-बांधे असल्याशिवाय ह्या गोष्टी कश्या शक्य आहेत ?? २००७ साली केलेल्या एखाद्या प्रस्तावाला किंवा tender ला २०१० किंवा ११ मध्ये मंजुरी मिळते हया आणि अश्या अनेक गोष्टी, यांचा अर्थ कसा लावावा ?? ज्याप्रमाणे पुर्वी "पाणी पण विकलं जईल" हा विचार कधी कोणी केला नव्हता त्याच प्रमाणे "पावसाळ्यातल्या रस्त्यांवरील खड्यांवर राजकारण आणि भ्रष्टाचार होईल" हाही विचार कदचित आधी कोणी केला नसेल..
मुंबई (आपल्या देशाची आर्थिक राजधानी), पुणे (विद्येचं माहेरघर), नाशिक - या आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सारखीच परिस्थीती आहे.. खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा की रस्त्यांवर खड्डे हा प्रश्न खरंच हैराण करून सोडणारा आहे.

खरं तर हे सगळंच खूप हास्यास्पद आहे.. पण शेवटी राहता राहतो एकच प्रश्न "RESPONSIBILITY" चा.. ह्या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची, त्यांची डागडुजी कोण करणार, Budget किती, कंत्राटदार कोण / कुठले, Tenders कोणती / कोणाची - ह्या सगळ्यांची उत्तरं मिळेपर्यंत अजुन १-२ पावसाळे आरामात निघुन जातात.. मग २ वर्षांनी पुन्हा तेच.. and it goes on..!!! पुन्हा ये रे माझ्या मागल्या...!!!

खरंच, हे पाऊस, खड्डे आणि राजकारण ह्यांचं त्रिकुट अजरामर आहे...!!!

-मंगेश केळकर
(२० जुलै २०११)

No comments:

Post a Comment