Wednesday, July 20, 2011

पाऊस, खड्डे आणि राजकारण...!!!


खरं तर पाऊस, श्रावण आणि त्यासोबत येणारे निसर्गाचे सौंदर्य या सगळ्यांवर आजतागायत भरपूर लिखाण झालं, कित्येक गाणी किंवा कविता झाल्या. सगळ्याच HIT झाल्या असं नाही पण if we count this number, it can definitely create a World record. आजवर इतर कुठल्याही भाषेत, इतर कुठल्याही विषयावर एवढं लिखाण झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही...
पण सद्य परिस्थीती काहीशी वेगळी आहे. सध्या पाऊस, श्रावण आणि त्यासोबत येणारे नैसर्गिक (किंवा कृत्रिम) खड्डे यांवर जेवढया चर्चा, विवाद आणि राजकारण होतं त्यापुढे कुठल्याही जगातला कुठलाही World Record फिकाच पडेल याबद्दल दुमत नाही.


पाऊस पडला नाही ह्याला जबाबदार कोण? तर कोणता तरी राजकीय पक्ष.. का तर म्हणे ह्यांच्या काळात वृक्षारोपण कमी झालं..
पाऊस जास्त झाला आणि पूर सदृश्य परिस्थीती झाली तरीही जबाबदार राजकीय पक्षच.. का तर म्हणे पाण्याचा निचरा करण्याची योजना चुकीची होती..
राजकारणीही तितकेच चलाख.. आपलं खापर दुसर-या नेत्यावर किंवा राजकीय पक्षावर फोडून मोकळे होतात..
किंवा एक ठरलेलं उत्तर म्हणजे कंत्राटदार..

मग विरोधी पक्षाचे सरकारवर ताशेरे.. मग सरकार कडून कोट्यावधी रुपयांची मंजुरी (फक्त खड्डे बुजवण्यासाठी किंवा ते दुरुस्त करण्यासाठी)..
आकडेवारी तर खरंच थक्क करून टाकणारी आहे.. २५०० खड्डे दुरुस्त करायला सरकारचं करोडो रुपयांचं budget ?? Expert Economistsना पण कठीण जाईल असं हे अर्थकारण राजकारणीच खेळू शकतात.. सत्ता आणि पैसा यांच्यासाठी हपापलेली ही राजकारणी मंडळी आपल्या खिशाचे खड्डे भरण्यासाठी अर्थकारणाची सगळी समीकरणंच बदलून टाकतात..

कंत्राटदार आणि राजकीय नेते (किंवा पक्ष) यांचे लागे-बांधे असल्याशिवाय ह्या गोष्टी कश्या शक्य आहेत ?? २००७ साली केलेल्या एखाद्या प्रस्तावाला किंवा tender ला २०१० किंवा ११ मध्ये मंजुरी मिळते हया आणि अश्या अनेक गोष्टी, यांचा अर्थ कसा लावावा ?? ज्याप्रमाणे पुर्वी "पाणी पण विकलं जईल" हा विचार कधी कोणी केला नव्हता त्याच प्रमाणे "पावसाळ्यातल्या रस्त्यांवरील खड्यांवर राजकारण आणि भ्रष्टाचार होईल" हाही विचार कदचित आधी कोणी केला नसेल..
मुंबई (आपल्या देशाची आर्थिक राजधानी), पुणे (विद्येचं माहेरघर), नाशिक - या आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सारखीच परिस्थीती आहे.. खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा की रस्त्यांवर खड्डे हा प्रश्न खरंच हैराण करून सोडणारा आहे.

खरं तर हे सगळंच खूप हास्यास्पद आहे.. पण शेवटी राहता राहतो एकच प्रश्न "RESPONSIBILITY" चा.. ह्या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची, त्यांची डागडुजी कोण करणार, Budget किती, कंत्राटदार कोण / कुठले, Tenders कोणती / कोणाची - ह्या सगळ्यांची उत्तरं मिळेपर्यंत अजुन १-२ पावसाळे आरामात निघुन जातात.. मग २ वर्षांनी पुन्हा तेच.. and it goes on..!!! पुन्हा ये रे माझ्या मागल्या...!!!

खरंच, हे पाऊस, खड्डे आणि राजकारण ह्यांचं त्रिकुट अजरामर आहे...!!!

-मंगेश केळकर
(२० जुलै २०११)

Wednesday, July 13, 2011

१३ जुलै २०११, आज पुन्हा एकदा मुंबापुरीला bomb blastsनी हादरवून सोडलं...

१३ जुलै २०११, आज पुन्हा एकदा मुंबापुरीला bomb blastsनी हादरवून सोडलं. दादर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलंय..!!


नेहमी मुंबई, ठाणे आणि पुणे यावरून वाद घालणारा मी आज पुन्हा एकदा हळहळलो. मुंबई पेक्षा ठाणे आणि पुणे prefer करण्याचं अजुन एक reason आज मला मिळालं होतं खरं, पण ह्या वेळी १ reason वाढल्याचा आनंद झाला नाही..
Spirit - Spirit च्या नावाखाली भरपूर सोसलं आहे मुंबईने..अजुन किती दिवस मुंबई हे सगळं सहन करणार?
"बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है" असं म्हणत बसून किंवा ह्या गोष्टींवरून राजकारण करून कहीही होणार नाहीये हे माहीत असून सुद्धा कुठलीच action घेतली जात नाही ह्या बद्दल खरं तर खंत व्यक्त केली पहिजे.

जगातलं so called "One Of the best Police department" म्हटलं जाणारं मुंबईचं पोलीस खातं, कुठे आणि काय खात बसलं आहे ही खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
news channelsना एक news मिळाली. सनसनाटी खबर. मग channels मध्ये चुरस.
राजकारणी लोकांना राजकारण समाजकारणात गुरफटण्याची अजुन एक संधी मिळाली.
पोलीस खात्याला अजुन एक Challenge मिळाला आणि आतंकवादाला मुंबापुरीशी छेडखानी करण्याचं समाधान मिळालं.

पण ह्या सगळ्यांत पुन्हा एकदा फरपट झाली ती सामान्य माणसाची. सकाळी officeला गेलेला रात्री घरी परतेल की नाही ह्याचीही त्याला खात्री राहिलेली नाही.
मुंबईला जिवंत ठेवण्यासाठी हा माणूस अजुनही मरतोय. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांची सांगड घालता घालता नाकी नऊ आले तरीही सकाळी भाऊगर्दीमध्ये धक्के खात खात ७:२१ ची लोकल अगदी वेळेत गाठतोय. ह्या भाऊगर्दीमध्ये तो कधी हरवून गेलाय हे देखील त्याला कळलं नाही.
Bomb Blasts, दंगल, दगडफेक, लाचखॊरी ह्या सगळ्या गोष्टींना त्यानी conveniently आपलसं करून घेतलंय. A PART & PARCEL OF LIFE. ही कदाचित त्याची मजबुरी असेल किंवा So Called "SYSTEM" ची भिती. Survival of the Fittest च्या नावाखाली स्वतःला prove करताना अश्मयुगातील माणसापेक्षाही जास्त मागे पडत चालला आहे. I can explain his state of mind in just one word - "CONFUSED".
अश्यावेळी अवधुत गुप्ते च्या गाण्यातल्या २ ओळी आठवतात -

"मंजिलॊंकी मुझकॊ तलाश है, पर पता नही किस तरफ़ बढूं
हाथ में मेरे तलवार है, पर पता नही के किससे लढूं"

मनात हजार प्रश्न, हजार शंका पण उत्तर कसलेच नाही. त्याची स्थिती सध्या अभिमन्यु सारखी झाली आहे. चक्रव्युहात पुरता अडकून गेला आहे.
आता मनात एकच आशा आहे की २०११ सालात तरी ह्या अभिमन्युला चक्रव्युहातून आपली सुटका करता यावी.....!!!!

शेवटी मी ठाणेकर असल्याचा कितीही अभिमान असला तरीही आज at the end of the day my heart says - Hats off to मुंबईकर...

-मंगेश केळकर